मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले आहे यामुळे धारणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे .पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पाचवा दरवाजाही उघडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पुराच्या पाण्याची फूग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली आहे.राधानगरी धरण मंगळवारी (दि. ३०) रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळपासून क्रमांक तीन, पाच व सहा असे तीन तर गुरुवारी चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. त्यांतून प्रतिसेकंद प्रतिसेकंद ७११२ घनफूट जलविसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने या नदीचे पाणी विस्तीर्ण भागात पसरले आहे.<br /><br />आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />#LokmatNews #Kolhapur<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19